ब्रिटिशांच्या विरोधात महात्मा गांधींनी उभारलेल्या सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून सन १९३०मध्ये चिरनेर जंगल सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहामध्ये जंगलचा कायदा तोडण्यासाठी सत्याग्रही जमावाने झाडे तोडण्यास सुरुवात केली. जंगलाचा कायदा तोडला, भारत माता की जय अशा जयघोषात सत्याग्रहाला गती आली.