१९६० मध्ये मुंबई राज्याचे विभाजन झाले. सौराष्ट्र, कच्छ, आणि मुंबई राज्यातील गुजरात प्रदेश यांचे मिळून स्वतंत्र गुजराती भाषिकांचे गुजरात राज्य करण्यात आले. मुंबई राज्यातील कोकण, देश, खानदेश, आणि हैदराबाद राज्यातील मराठवाडा, मध्य प्रदेशातील विदर्भ आणि वऱ्हाड यांचे मिळून मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य करण्यात आले.