२००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष आणि ४९,६५,१४,३४६ स्त्रिया अशी एकूण १,०२,८७,३७,४३६ (एक अब्ज दोन करोड सत्त्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे छत्तीस) होती. एकूण लोकसंख्या ही १९९१ च्या जनगणनेत मोजलेल्या ८४,६४,२७,०३९ लोकांपेक्षा १८,२३,१०,३९७ ने अधिक वाढली, म्हणजेच २१.५% जास्त.