केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विलीनीकरण करण्याची घोषणा करताना असं सांगितलं होतं की, हे विलीनीकरण झाल्यानंतर देशामध्ये सरकारी बँकांची संख्या 12 वर येईल. 2017 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 होती. याआधी देना बँक आणि विजया बँक, बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाली होती.