मानवी इतिहासात जगण्यासाठी, रोजगारासाठी आणि नवे काही शिकण्यासाठी कायमच स्थलांतरे होत आलेली आहेत. अनेकदा या स्थलांतराला युद्धे, लढाया, दंगली आणि वांशिक अत्याचार अशी कारणेही आढळतात. ही सर्व कारणे काळाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत गेलेली दिसतात. भविष्यात यापुढेही हे स्थलांतर असेच सुरू राहील.