एखाद्या गोष्टीचे आकलन झाल्यानंतर किंवा वर्गातील अध्यापनातील अनुभवातून व्यक्तीच्या वर्तनात कायमस्वरूपी बदल होणे म्हणजे अध्ययन. तसेच एखाद्या प्रसंगातूनही (वाईट किंवा चांगले) व्यक्तीला अध्ययन होऊ शकते. अध्ययन ही जीवनाभिमुख प्रक्रिया आहे. मानव जातीच्या जीवनात सतत परिवर्तन होत असून त्यात अध्ययनाचा मोठा वाटा असतो.