कलांच्या अध्यापनात सौंदर्यप्रतीती व्हावी न सौंदर्यनिर्माणशक्ती विकसित व्हावी हा हेतू असतो. यासाठी निरीक्षण, तुलना, समालोचन, अनुकरण इ. प्रतिक्रियांचा उपयोग करावा लागतो. सर्व शालेय विषयांच्या अध्यापनात ज्ञानग्रहण हे उद्दिष्ट असल्यामुळे ज्ञानदानासाठी कथनाचा व ज्ञान पक्के करण्यासाठी परिपाठांचा अवलंब करावा लागतो.