अनौपचारिक पत्रामध्ये आपण आपले सुख, दुःख, आनंद ,उत्साह ,अभिनंदन, शुभेच्छा इत्यादी प्रकारचे वर्णन करू शकतो. त्यामुळे या पत्राची भाषा ही भावपूर्ण ,हृदयस्पर्शी असते. हे पत्र आपण विशेषतः जवळील लोकांशी चौकशी करण्यासाठी, आमंत्रन पाठवण्यासाठी व काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी लिहीत असतो.