त्याला परिचित असलेल्या विविध विचारवंतांच्या नैतिक शिकवणुकीतून व बहुधा त्याच्या स्वतःच्या जीवनानुभवातून वेचून घेतलेल्या गोष्टींचे ते सार होते.

उच्च दर्जाची सामाजिक नीतिमत्ता व नागरिकांची जबाबदारी यांच्यावर तो आधारलेला होता. त्याने जीवनातील व्यावहारिक शब्दांमध्ये आपला 'धम्म' सांगितला.