नैसर्गिक संसाधनांचा वापर उचित झाला तरच पर्यावरणाचा समतोल कायम राहील. अनेक पारिस्थितिकी तज्ज्ञांनी असे दाखवून दिले आहे की, मानवाच्या अनिर्बंध वापरामुळे नैसर्गिक संसाधनांचा Nहास असाच चालू राहिला तर सजीवसृष्टीतील अनेक घटकांच्या अस्तित्वास धोका पोहोचेल, मानवाचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात येईल.