आपत्तीमुळे मानवी जीवनात अडथळे निर्माण होतात. कोरोनासारख्या आपत्ती मानवी जीवन तर उध्वस्त करतातच सोबत अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम करतात. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीवर जर काही प्रमाणात मात करायची असेल, तिची तीव्रता कमी करायची असेल तर मानवाला आपत्तीचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे.