आपण बुद्धिमान घटक असल्यामुळे, पर्यावरणाचे रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे. प्राचीन काळात पशुपक्षी, वृक्ष, डोंगर, इतर.. हे देवाचे अवतार किंवा देवाची वाहने अशी अगाध श्रद्धा मानवाची होती. झाडे तोडल्यामुळे, प्राण्यांची हत्या केल्यामुळे देवीदेवतांचा कोप होईल, अशी मानवाच्या मनात श्रध्दात्मक भीती होती.