हे स्मारक भारताची इच्छाशक्ती, भारताच्या भविष्याचं, भारतात होणाऱ्या बदलांचं प्रतीक आहे. पूर्वेत तर आयआयटीची स्थापना झाली पण तितकंच औद्योगिकीकरण झालेल्या पश्चिम भारतातही आयआयटी व्हावी अशी मागणी वाढच गेली. यासाठी नेहरूंनी रशियाची मदत घेत १९५८ साली मुंबई येथे नवीन आयआयटीची स्थापना केली.