शाश्वत विकास हा आर्थिक विकासापेक्षा मोठा आहे. कमी कालावधित झालेला विकास हा जास्त काळ टिकू शकत नाही . माणसाच्या पायाभूत गरजा पूर्ण होणे आवश्यक आहेच. पण याचबरोबर शाश्वत विकासामध्ये भविष्यातील पिढीने आपल्या गरजा ( पाण्याची संसाधने, हवेची गुणवत्ता ) नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास न करता पूर्ण करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.