स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत चालल्याने ब्रिटिश सरकारला याची गंभीर दखल घ्यावी लागली. भारतातील आपली सत्ता यापुढे टिकू शकणार नाही, याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सरकार विविध योजना तयार करू लागले. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडू लागली.