आपण जाणतोच की १८१८ ला मराठा विरुद्ध इंग्रज असे युद्ध झाले, मराठे हरले आणि त्या इंग्रजांचा युनियन जॅक सर्व ठिकाणी फडकू लागला होता. तेव्हाच अनेक किल्ले देखील ह्या इंग्रजांनी जिंकायला सुरुवात केली होती, काही तहात, काही युद्धात, तर काही कटकारस्थान करून इंग्रजांनी शंभरहून अधिक किल्ले ताब्यात घेतले.