विविध संस्कृतीचा पाया जाणून घेण्यासाठी इतिहास संशोधन अतिशय महत्त्वाचे आहे. वर्तमानकाळाचे धागे हे इतिहासाशी जोडले असल्याने इतिहासाविषयी मोठे अप्रुप असते. संशोधनांद्वारे त्याला उत्तरे मिळत असतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संचालक व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. तेजस गर्गे यांनी केले.