वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असेही म्हटले जाते. काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत. उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना 'ब्रह्मविद्या' असेही म्हणतात. या साहित्यात प्रामुख्याने धर्म, सृष्टी आणि आत्मा किंवा परमात्मा याविषयी चर्चा केली दिसून येते.