औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील सर्वात महत्वाचा जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असलेला हा जिल्हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. १६१० मध्ये निजामशहाचा सरदार मलिक अंबर याने औरंगाबाद शहर वसवले.