औरंगाबाद विकसित शहर आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
औरंगाबाद हे राज्यातील मध्यवर्ती शहर असून येथील भौगोलिक परिस्थिती, वातावरण चांगले असल्याने मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद शहरात राहण्यास पसंती मिळत आहे. एका दशकात शहर व परिसराचा झालेला विकास, वाढलेल्या पायाभूत सुविधांमुळे शहर व परिसरातील नागरी भाग झपाट्याने विकसित होत आहे. शहराला निसर्गाचे देणे लाभले असून चारही बाजूने टेकड्या, रमणीय डोंगर आहेत. येथील वातावरण हे राहण्यासाठी उत्कृष्ट आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मोठे अधिकारी, पुणे-मुंबईनंतर औरंगाबादला पसंती देत आहेत. क्रेडाईने आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ही बाब अधोरेखित होत आहे.