कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते; तिला समभागाची दर्शनी किंमत म्हणतात. समभागाच्या मालकाला भागधारक म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी कंपनीच्या मालकीतील वाटेकरी बनतो. भारतातील कंपन्यांच्या एका समभागाची किंमत बहुधा १० रुपये असते.