काश्मीर हा कश्यप ऋषीच्या वास्तव्याने पुनित झालेला हा प्रांत आहे. पूर्वीपासून काश्मीरवर कायम आक्रमण झाले. अफगाण, इराण, मुगलांचे आक्रमण आणि त्यांनाच आश्रय दिल्याने त्या त्या कालखंडात आश्रितांनीच दगाफटका केला. त्यामुळे काश्मीर, जम्मू आणि लडाख या प्रांतांचे नुकसान झाले.