किल्ला, गड, कोट असे देशी भाषेत ज्याला म्हटले जाते त्याला दुर्ग असे संस्कृत नाव प्रचलित आहे. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. संरक्षक तटबंदीने युक्त आश्रयस्थान म्हणजे दुर्ग किंवा किल्ला होय. विशेषतः शत्रूला जिथे प्रवेश करणे कठीण असते असे स्थान (दुर्‌ + ग) अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे.