नियमन कलम 75(3)च्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ हे भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहास (लोकसभा) उत्तरदायी आहे. जेव्हा लोकसभेत मंत्र्याने मांडलेले एखादे विधेयक मंजूर होत नाही, त्यास तेव्हा संपूर्ण मंत्रीपरिषद जबाबदार असते. लोकसभेचा विश्वास गमावल्यानंतर मंत्रिमंडळ नवीन सरकारच्या स्थापनेसाठी राजीनामा देते.