हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात. जम्मू काश्मीर आणि लडाख यांचे विभाजन करून जरी ९ केंद्रशासित प्रदेश झाले होते तरी दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली या विलानीकरणामुळे पुन्हा ती संख्या ८ झाली आहे.