ही भारतातील शेतीशी संबंधित नियम आणि कायदे तयार करण्यासाठी व प्रशासनासाठी सर्वोच्च संस्था आहे. मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रातील तीन व्यापक क्षेत्रे म्हणजे कृषी, अन्न प्रक्रिया आणि सहकार. कृषी मंत्रालयाचे अध्यक्ष कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर हे आहेत. अभिषेक सिंग चौहान, कृष्णा राज आणि परसोत्तमभाई रूपाला हे राज्यमंत्री आहेत.