कोप्पल जिल्हा हे राज्यातील सर्वोत्तम बियाणे उत्पादन केंद्र आहे. अनेक राष्ट्रीय बियाणे कंपन्यांची येथे फुले, फळे, भाजीपाला आणि कडधान्यांसाठी बीजोत्पादन केंद्रे आहेत. अणेगुंडी, कनकगिरी, नववृंदावन आणि कुकनूर ही पर्यटनाची महत्त्वाची ठिकाणे आहेत.