डिसेंबर 1953 मध्ये, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भाषिक राज्यांच्या निर्मितीचा अहवाल तयार करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग नियुक्त केला. या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फजल अली होते म्हणून त्याला फजल अली आयोग असे म्हणतात. आयोगाने 1955 मध्ये भारतातील राज्यांची पुनर्रचना करण्याचा अहवाल दिला.