लहान वयातच घरातील सुखसोयी सोडून ते ज्ञानाच्या शोधात निघाले. त्यांनी अनेक वर्षे भटकंती केली आणि इतर समकालीन विचारवंतांना भेटून चर्चा केली. बिहारमधील बोधगया येथे पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी अनेक दिवस ध्यान केले. येथे, ध्यान केल्यानंतर , त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले.