राज्य शासनाने किमान वेतन दर लागू करण्यासाठी मंजुरी दिल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 61 प्रमाणे ग्रामपंचायतीला त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरविण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार उद्योग , उर्जा व कामगार विभागाच्याच्या मंत्रालयाकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन दर लागू करण्यात आले आहेत.