होय, कारण ग्रामसभा आणि ग्रामपंचायती गावातील लोकांच्या कल्याणासाठी काम करतात . त्यांनी गावकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे आणि ते महत्त्व आणि गरजेनुसार सोडवावे.सर्व सदस्यांनी ग्रामसभेच्या सभांना उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे कारण सभेत चर्चा झालेल्या विविध योजनांच्या कार्यवाहीत सहभागी होण्याचा हा एकमेव मार्ग आहे . ग्रामसभेचे सदस्य वेगवेगळ्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांनी आपल्या स्थानिक समस्या आणि विकास कार्यक्रम सभांमध्ये मांडणे महत्त्वाचे आहे.