ग्रामपंचायतीचा एक सचिव असतो जो ग्रामसभेचाही सचिव असतो. ही व्यक्ती निवडून आलेली नसून सरकारद्वारे नियुक्त केलेली असते. ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीची बैठक बोलावणे आणि कार्यवाहीच्या नोंदी ठेवणे ही सचिवाची कामे आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणूका पाच वर्षांसाठी होतात