ग्रामीण भागातील उद्योजकता वाढण्यात अडथळे येत आहेत किंवा सुरू झालेले व्यवसाय यशस्वीपणे चालण्याचे प्रमाण कमी आहे. बर्‍याचदा व्यवसायात अपयश येण्याचे किंवा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे न चालण्याचे मुख्य कारण असते व्यवसाय सुरू करताना चुकलेल्या पायर्‍या आणि व्यवसाय कसा करावा याचे अज्ञान.