जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन समितीचा सचिव असतो. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार विकास कामाची अंमलबजावणी करणे हे जिल्हा प्रशासनाचे काम असते. तसेच केंद्रीय आणि राज्य कार्यकारी मंडळाने आखलेल्या विकासाच्या योजना अंमलात आणण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असते.