गाड्या धुण्यासाठीही पाण्याचा प्रचंड उपसा होतो. त्यामुळे गाड्या आठवड्यातून दोनदाच किंवा एकदाच धुवा. पाण्याची टाकी भरूनही पंप चालू राहिल्याने जे पाणी फुकट वाया जातं, त्याला आळा घालण्यासाठी सेन्सर असणारे पंप वापरा. त्यामुळे ते पंप टाकी भरल्यावर आपणहून बंद होतील आणि पाण्याचा व विजेचा अपव्यय टळेल.