१९५६च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हैदराबाद संस्थानाचे विभाजन होऊन तेलगू भाषकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला, मराठी भाषकांचा प्रदेश महाराष्ट्राला जोडला गेला, कन्नड भाषकांचा प्रदेश कर्नाटकाला जोडला गेला. २ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले.