त्रावणकोर म्हणजे आजच्या केरळचा काही भाग. सागरी सीमेवर असल्याने, त्रावणकोर देखील हैदराबादप्रमाणे स्वतंत्र राहण्याची योजना आखत होता. त्यामुळेच जवळपास २ वर्ष भारतात तो समाविष्ट देखील झाला नव्हता. परंतु भारताच्या सततच्या दबावानंतर, त्रावणकोरने १ जुलै १९४९ रोजी इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशनवर स्वाक्षरी केली.