पाचवे किंग जॉर्ज यांनी १२ डिसेंबर, १९११ ला 'नवी दिल्ली दरबार' या शाही समारंभामध्ये ''आता कलकत्ता ऐवजी दिल्ली ही देशाची राजधानी असेल'', अशी घोषणा केली होती. त्यावेळीच देशाच्या नव्या राजधानीचा त्यांनी पाया घातला होता. १३ फेब्रुवारी १९३१ ला भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड एरविन यांनी नवी दिल्लीचे उद्घाटन केले होते.