१९६० मध्ये झालेल्या पहिल्या हरित क्रांतीमुळे देशव्यापी कृषी विस्तार तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला आणि त्याचबरोबर औद्योगिक प्रगतीची किरणे डोकावू लागली. आज तब्बल ६० वर्षांनी पुन्हा एकदा दुसरी हरित क्रांती सुरू झाली ती २६ नोव्हेंबर पासून. निमित्त ठरले नवीन जाचक कृषी कायदा पूर्ण रद्द करण्यात यावा यासाठी.