इंग्रज राजवटीतून भारत मुक्त झाला. मात्र, इंग्रजांनी ज्या भारतावर राज्य केलं त्याचे दोन तुकडे झाले म्हणजेच भारताची फाळणी झाली. एक भारत आणि दुसरा भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान. या पाकिस्तानचे पुढे आणखी दोन तुकडे झाले आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेशची निर्मिती झाली.