कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात लोकसंख्या हे अत्यंत महत्त्वाचे संसाधन आहे. परंतु नुसती लोकांची संख्या जास्त असून चालत नाही तर त्या लोकसंख्येत गुणवत्ता असणेही खूप गरजेचे असते. लोकांची गुणवत्ता ही साक्षरता, कुशलता, वयोगट यानुसार निश्चित केली जाते.