नदी, तलाव, समुद्र इत्यादीं मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व विषारी पदार्थ टाकले जातात. हे पदार्थ पाण्यात प्रवेश केल्यावर त्यात मिसळतात किंवा जसेच्या तसे पाण्याखाली जाऊन बसता. विषारी पदार्थांमुळे पाण्याची गुणवत्ता कमी होते व हे प्रदूषित पाणी पिल्याने अनेक रोग वाढायला लागतात.