जमिनीचं आरोग्य हे जमिनीत असणारे घटक आणि जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असतं. जमिनीमध्ये असणारी खनिजद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ, जल आणि वायू हे चारही घटक पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं. जमिनीचं आरोग्य चांगलं असेल तरच ती चांगल्या प्रमाणात उत्पादन देते.