पंज म्हणजे फारसी भाषेत पाच आणि आब म्हणजे फारसी भाषेत पाणी यांच्या एकत्रीकरणाने पंजाब हे नाव बनले. पूर्वी या प्रदेशाला पंचनद असेही म्हणत. १९४७ साली भारताची फाळणी झाल्यावर पश्चिम पंजाब पाकिस्तानात गेला.