पर्यावरणाच्या दृष्टीने ही चांगली अनुभूतीच आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत राहिला तर साथीचे अनेक रोग पसरायला मदत होते. सार्स, इबोला, निपा, चिकनगुनिया, मलेरिया, स्वाइन फ्लू आणि आता करोना हे सारे साथीचे रोग पर्यावरणाचे संरक्षण करता न आल्यामुळेच जगभर पसरले व वाढले. हे लक्षात घेता पर्यावरणाचे महत्त्व किती आहे हे कळून येते.