इंग्रजांनी भारताला स्वातंत्र बहाल करताना देशाची फाळणीही केली. त्यामुळे पाकिस्तान आणि भारत हे दोन देश निर्माण झाले. पाकिस्तानला १४ ऑगस्ट रोजी तर भारताला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळालं. भारतात स्वातंत्र्यदिन साजरा करताना ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांचं स्मरण केलं जातं.