दरवर्षीचा उन्हाळा हा महाराष्ट्रात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही राज्यात पाणीटंचाई आहे, पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही तर वीजटंचाई, गैरप्रशासन, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर हीही पाणीटंचाईची कारणे आहेत. राज्याच्या विविध भागातील पाणीटंचाईची स्थिती आणि त्यावर करण्यात येणारे उपाय यांचा हा विभागवार आढावा