पाण्याच्या अतिरिक्त वापर करताना जर शुद्ध न केलेले पाणी वापरावे लागले तर आरोग्याच्या समस्या उद्‌भवू शकतात. पाण्याची बचत केल्याने जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पांच्या उभारणीसाठी आणि दुरुस्ती-देखभालीसाठी होणारा खर्च कमी होऊ शकतो. पर्यायाने जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेसाठी लागणारी वीजेचीही बचत होते.