पृथ्वीवर आपल्यासारखी प्रगत जीवसृष्टी निर्माण होण्याचं कारण आपण म्हणजे सजीव पाण्यातून जमिनीवर आले, हे आहे. या स्थलांतरालादेखील जो खगोलीय घटक कारणीभूत आहे तो म्हणजे चंद्र. चंद्रामुळे पृथ्वीवरच्या पाण्याला भरती ओहोटी येते. त्यामुळेच पाण्यातले काही सजीव कालांतराने जमिनीवर येऊ शकले.