पाण्याची नक्की टक्केवारी, ती सुद्धा एका दिवसातली किंवा कमी कालावधीतली, काढणे कठीण आहे. अशी टक्केवारी ही साधारणपणे वर्षभराच्या कालावधीवर काढणे उचित ठरेल. बाष्पीभवन होऊन पाणी जाते हे खरे असले तरी, पावसाच्या रूपाने तेच पाणी पुन्हा पृथ्वीवर येतच असते. त्यामुळे वर्षभरातील पाण्याची टक्केवारी ही साधारणपणे सारखीच रहाते.